आधुनिक भारताचा इतिहास- 50 प्रश्न व उत्तर | संकीर्ण माहिती संच | राज्यसेवा पूर्व परीक्षासाठी महत्वाचे प्रश्न



आधुनिक भारताचा इतिहास- 50 प्रश्न व उत्तर

 

लॉर्ड कॅनिंग ने कोणती परीक्षा भारतात सुरू केली?

उत्तर- इंडियन सिविल सर्विस

 

मुस्लिम सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर हमीद दलवाई

 

बॉम्बे मिल हॅन्ड असोसिएशनची स्थापना कोणी केली?

उत्तर- एन. एम. लोखंडे

 

सामाजिक परिषद कोणी सुरू केली ?

उत्तर- न्यायमूर्ती रानडे

 

पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक कोण होते?

उत्तर- ग.वा. जोशी

 

हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी ही संस्था कोणी स्थापन केली ?

उत्तर - भगतसिंग व चंद्रशेखर आजाद

 

हिंदू मेळा या संघटनेची स्थापना कोणी केली?

उत्तर - नवगोपाळ मित्र

 

कोणाच्या आझाद दस्ता या संघटनेने ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय करून सोडले होते?

उत्तर- भाई कोतवाल

 

लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज ची स्थापना करणारे कोण होते?

उत्तर- लाला हंसराज



1938 मध्ये कोणाच्या पुढाकाराने हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना झाली?

उत्तर- स्वामी रामानंद तीर्थ

 

कोलकाता येथे बेथन  यांच्या पुढाकाराने मुलींसाठी पहिली शाळा कधी स्थापन झाली ?

उत्तर- 1848 रोजी

 

विधवा विवाहाला कधी कायदेशीर मान्यता मिळाली ?

उत्तर - इसवी सन 1856 रोजी

 

मुस्लिम अँग्लो ओरिएंटल कॉलेज ची स्थापना कोणी केली?

उत्तर - सर सय्यद अहमद खान (1875 अलिगड)

 

1857 मध्ये मुंबईत मराठी नाटकासाठी पहिले नाट्यगृह कोणी बांधले ?

उत्तर- नाना शंकर शेठ

 

सदाचार हाच खरा धर्म आहे ही शिकवण कोणी दिली ?

उत्तर- श्री नारायण गुरु

 

विधवा विवाहास कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी कोणी पद्धतशीर प्रयत्न केले ?

उत्तर-  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर

 

विधवा पुनर्विवाह पुरस्कार करून स्वतः विधवेशी विवाह करणारे कोण होते?

उत्तर - विष्णुशास्त्री पंडित

 

फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य कोण होते ?

उत्तर - वामन शिवराम आपटे

 

पार्लमेंटची मागणी करणारे दोन समाजसुधारक कोण?

उत्तर - राजा राम मोहन रॉय व लोकहितवादी

 

थोर समाजसेविका अनंतशास्त्री डोंगरे यांच्या कन्या व बिपीन बिहारी बोस यांच्या पत्नी कोण ?

उत्तर - पंडिता रमाबाई

 

आर्य समाजाने हिंदू धर्मातून अन्य धर्मात गेलेल्यासाठी कोणती मोहीम सुरू केली?

ऊत्तर- शुद्धीकरण चळवळ

 

 जनसंघाचे संस्थापक कोण?

 उत्तर - श्यामाप्रसाद मुखर्जी

 

 वाई येथे प्राज्ञपाठशाळा ची स्थापना कोणी केली?

 उत्तर- ब्रह्मभूत  केवलानंद सरस्वती

 

मुंबई प्रांतात रयतवारी व महालवारी पद्धतीची सांगड घालून महसूल व्यवस्था निर्माण करणारा गव्हर्नर कोण?

उत्तर - लॉर्ड एलफिस्टन

 

ज्यांना  बाटायचे नसेल त्यांनी माझा कित्ता गिरवावा हे उद्गार कोणाचे आहेत ?

उत्तर- मंगल पांडे

 

मी सत्ता मानत नसल्याने मी  बंड केले” असे म्हणताच येत नाही हे उद्गार कोणाचे आहेत ?

उत्तर- तात्या टोपे

 

कोणाची तुलना मोगल कारकीर्दीतील औरंगजेबाशी केली जाते ?

उत्तर- लोर्ड कर्जन

 

सायमन कमिशनची नेमणूक झाली त्यावेळी भारतातील व्हाईसरॉय कोण होते ?

उत्तर - लॉर्ड आयर्विन

 

ऑगस्ट ऑफर म्हणून ओळखली जाणारी घोषणा 8 ऑगस्ट 1940 रोजी कोणी केली?

उत्तर-  लॉर्ड लीनलीथगो 

 

लोकमान्य टिळकांनी कोणते दोन उत्सव सुरू केले होते ?

उत्तर- सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती

 

बालकामगारांच्या संरक्षणासाठी फॅक्टरी ॲक्ट कोणाच्या कारकिर्दीत प्रथम पास करण्यात आला?

उत्तर - लॉर्ड रिपन

 

इल्बर्ट बिल विधेयक कोणत्या बाबीशी संबंधित होते ?

उत्तर - न्यायव्यवस्थेतील काळा-गोरा भेद रद्द करणे

 

लोकसेवा आयोगाची स्थापना कोणी केली?

उत्तर- लॉर्ड डफरीन

 

1947 मध्ये भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांच्या निर्मितीची 2 जून योजना कोणी तयार केली?

उत्तर- लॉर्ड माउंट बॅटन

 

1830 ते 1833 अशी तीन वर्षे राजा राम मोहन राय यांनी मुघल  बादशहाचे दूत म्हणून कोठे काम केले?

उत्तर- इंग्लंड या ठिकाणी

 

प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत ?

उत्तर- आत्माराम पांडुरंग, डॉक्टर भांडारकर, व न्यायमूर्ती रानडे

 

1927  यावर्षी संस्थानामधील प्रज्ञा परिषदांना एकत्र आणणारी अखिल भारतीय संस्थांनी प्रजा परिषद स्थापन करणारे नेते कोण?

उत्तर - बलवंतराय मेहता व मणिलाल कोठारी

 

1933 मध्ये पाकिस्तान नेशनल मोमेंट ही संघटना कोणी स्थापन केली ?

उत्तर-  रहमत अली चौधरी

 

1936  यावर्षी स्वामी सहजानंद यांच्या प्रेरणेने कोणती संघटना स्थापन झाली ?

उत्तर -अखिल भारतीय किसान सभा

 

इंडियन नॅशनल ट्रेड युनियन ची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

उत्तर - 1947

 

रॉयल एशियाटिक सोसायटी ची स्थापना कोणी केली?

उत्तर- विल्यम जोन्स

 

दाभाडी प्रबंध हे धोरणविषयक निवेदन कोणत्या पक्षाशी संबंधित आहे?

उत्तर- शेतकरी कामगार पक्ष

 

प्रथम वैयक्तिक सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड झाली तर दुसरे सत्याग्रही म्हणून कोण आहेत?

उत्तर- पंडित जवाहरलाल नेहरू

 

करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली?

उत्तर- महात्मा गांधी

 

इंग्लंडने भारतासहित आपण दुसऱ्या महायुद्धात उतरत असल्याचे कधी जाहीर केले ?

उत्तर - 3 सप्टेंबर 1939

 

लोकमान्य टिळकांनी राजद्रोहाच्या आरोपाखाली सहा वर्षाचा तुरुंगवास कोणत्या तुरुंगात भोगला?

उत्तर- मंडाले (म्यानमार)



दक्षिण आफ्रिकेत गांधीजीनी कोणते आश्रम उभे केले?

उत्तर- फीनिक्स आश्रम व टॉल्स्टॉय  फार्म

 

1929 मधील राष्ट्रीय सभेच्या लाहोर अधिवेशनात संमत करण्यात आलेला ठराव कोणता?

उत्तर - पूर्ण स्वराज्याचा ठराव

 

1932 नंतर गांधीजींनी कोणता आश्रम स्थापन केला ?

उत्तर- वर्धा येथे सेवाग्राम आश्रम

 

गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?

उत्तर - सरोजिनी नायडू

 

सविनय कायदेभंग चळवळी दरम्यान भारतातील चिघळत चाललेली परिस्थिती पाहून ब्रिटिश सरकारने कोणती  घोषणा केली?

उत्तर-  गोलमेज परिषद घेण्याची

 

महात्मा गांधीजींनी यंग इंडिया चे नाव बदलून कोणते नाव ठेवले?

उत्तर - हरिजन

 

हैदराबाद संस्थानातील वंदेमातरम आंदोलनाचे नेते कोण होते?

उत्तर - गोविंदभाई श्रॉफ